Wednesday, October 5, 2016

All Things Bright And Beautiful, a Fundraiser for WSD on Oct, 14, 2016 at St Andrews Auditorium, Bandra

The Welfare of Stray Dogs (WSD) is an animal welfare NGO carrying out the Animal Birth Control programme of sterilizing and vaccinating stray dogs in Mumbai. The objectives of this programme are to control the population of stray dogs and more importantly to reduce human rabies deaths. Our other activities include an on-site first-aid programme, rabies awareness & immunization drives, education and awareness programme and adoption programme. Till date, WSD has impacted the lives of more than one lakh forty thousand dogs. The Welfare of Stray Dogs spends over Rs 80 lakhs per annum on the above mentioned activities. 

The Stop-Gaps Choral Ensemble of The Stop-Gaps Cultural Academy has graciously put together a show ‘All Things Bright And Beautiful’ on Friday, October 14, 2016, 7:30 pm at the St Andrews Auditorium , Bandra to support WSD’s projects.

A song for the dog on the street, stray cat, injured bird, abandoned helpless creatures, all of God’s creation! A galaxy of performers join The Stop-Gaps in this one of a kind concert to create an awareness and bring relief to the less fortunate of our four legged and winged friends.

The line-up includes Ella Atai, Shahariyar Atai,  Kim Cardoz, Zenaida Fernandes, Devika Madgavkar, Marie Paul, Petula Rodricks, Tara Sutaria, Musicosa, The Stop-Gaps Choral Ensemble , The Stop-Gaps Junior Choral Ensemble and a host of others. Cyrus Broacha would be compering the show.

The concert is being whole heartedly supported by The Rotary Club Of Bombay.

The tickets are priced at Rs 500 and Rs 300 and are available at

1) St Andrews Auditorium, Bandra
2) WSD Office, Kala Ghoda - Tel - 65343341

Monday, October 3, 2016

जरा शिद्दतसे चाहो तभी होगी आरजू पूरी
हम वो नही जो तुम्हे खैरातमें मिल जायेंगे

(Forwarded)

एक माणूस एक दिवस (भाग ३) - ह. मो. मराठे

तुम्ही म्हणाल ह्या पुस्तकाचे पहिले दोन भाग सोडून एकदम तिसरा भाग वाचण्याचं काय खास कारण? 'माझा वेंधळेपणा'. आणखी काही नाही :-) झालं असं की लायब्ररीत पोचले तेव्हा आधीच उशीर झाला होता. काढून ठेवलेल्या गठ्ठ्यातून पटकन पुस्तकं काढून चाळून पाहिली. ह्या पुस्तकातली व्यक्तिमत्वं इंटरेस्टिंग वाटली. व्हॉटसएप वर आलेल्या मूळ सूचीत ह्याचे एकापेक्षा जास्त भाग आहेत असा उल्लेख नव्हता आणि गठ्ठ्यातसुध्दा हा एकच भाग होता. त्यामुळे माझ्या ते लक्षात आलं नाही. वाचायच्या वेळेस आलं. आता पुस्तक परत करतेवेळी बाकीचे भाग आहेत का ते विचारायला लागेल.

पुस्तकाची मूळ कल्पना म्हणजे आपापल्या क्षेत्रात प्रसिध्द अश्या व्यक्तीसोबत एक पूर्ण दिवस घालवून त्याबद्दल वाचकांना माहिती देणारा लेख लिहिणे. पहिली व्यक्ति म्हणजे मधू दंडवते. खरं तर मधू आणि प्रमिला दंडवते ही नावं मी फक्त ऐकलेली. त्यांच्याबद्दल फारसं काही माहीत नव्हतं. त्यामुळे कोकण रेल्वे प्रत्यक्षात आणण्यात मधू दंडवते ह्यांच्या असलेल्या सहभागाबद्दल वाचून आश्चर्य वाटलं. निवडणूक म्हणजे काय मामला असतो त्याचं थोडंसंच का होईना पण मस्त दर्शन ह्या लेखातून घडतं. पुढला लेख अण्णा हजारेंवरचा. मला ह्यांच्याबद्दलही उपोषण, आप व्यतिरिक्त फारशी माहिती नव्हती. त्यांनी सैन्यात सैनिकांना रसद पुरवण्यासाठी गाड्या चालवायचं केलेलं काम, त्यात सीमेवर आलेला चित्तथरारक अनुभव, राळेगणसिध्दी गावाचा केलेला कायापालट ही सर्व माहिती नवीन होती. वर्तमानपत्रात अश्या लोकांच्या आधीच्या कार्यावर कधीच काही माहिती येत नाही - ती येते ती ते गेल्यावर आणि त्यांच्या प्रत्येक पुण्यतिथीला. कटू असलं तरी हे वास्तव आहे.

तिसरा लेख नाना पाटेकर वरचा. मी हिंदी चित्रपट फारसे पहात नाही. त्याचा प्रहार अर्धवट पाहिलाय. खामोशी आणि अग्निसाक्षी बऱ्यापैकी पाहिलाय. बाकी पिक्चर तुकड्यातुकड्यात कधीकधी चेनेल सर्फिंग करताना. त्याने अभिनय केलेली नाटकं तर अर्थात पहायचा कधी योगच आला नाही. त्याच्या विक्षिप्तपणाच्या कहाण्या मात्र बऱ्याच वाचल्या आहेत. तरी आधीच्या दोघांच्या मानाने ह्याची माहिती अधिक होती असंच म्हणायला लागेल. एखाद्या चित्रपटाचं शुटींग कसं चालतं ते ह्या लेखातून व्यवस्थित समजतं. अलीकडच्या काळातली ही स्थिती तर ६०-७० च्या दशकात कसल्या दिव्यातून पार पडून उत्तम हिंदी चित्रपट काढले गेले असतील असा विचार मनात येतोच. एक माणूस म्हणून आणि एक अभिनेता म्हणून नाना पाटेकर ह्या लेखातून कळतो. नंतरचा लेख 'कायनेटिक' च्या अरुण फिरोदियांवरचा. इथेही 'पुण्याची बाईक्स बनवणारी कंपनी' ह्याव्यतिरिक्त फारशी माहिती मला नाही. त्यांनीसुध्दा एक लाखातली कार बनवायचा प्रयत्न केला होता ही माहिती नवीन. कधी पेपरातदेखील ह्याबद्दल वाचल्याचं आठवत नाही. त्या कारचं काय झालं कोणास ठाऊक. एका बिझनेसमनचं आयुष्य किती व्यस्त असतं हे ह्या लेखावरून जाणवतं. पण 'भारताला फारसा संघर्ष न करता स्वातंत्र्य मिळालं' हे त्यांचं वाक्य खूप खटकलं. ह्या वाक्यावर लेखकानेही त्यांना अधिक काही विचारलं नाही हे आश्चर्यच.

शेवटला लेख 'नरेंद्र महाराज' ह्यांच्यावर. आता हे 'नरेंद्र महाराज' कोण हे मला अर्थातच माहित नव्हतं. त्यांच्यावर लेख लिहायचं कारण काय तेही समजेना. मला एकूणात हे बाबा, महाराज, साध्वी ह्या प्रकाराबद्दल मनापासून चीड आहे. धर्माचा बाजार करून आपली तुंबडी भरायचे उद्योग आहेत. देव आणि भक्त ह्यांच्यामध्ये कोणी कशाला हवं? आणि एखादा असलाच सच्चा गुरु तर तो नक्कीच एव्हढा बोलबाला करणार नाही ह्याची मला पक्की खात्री आहे. पण आहे तरी काय हे प्रकरण अश्या कुतूहलाने मी लेख वाचायला घेतला. ह्या महाराजांबद्दलच्या अनेक मतप्रवाहामुळेच लेखकानेसुध्दा एकदा स्वत:च्या डोळ्यांनी पाहून काय ते ठरवावं ह्या हेतूने ह्या महाराजांसोबत एक दिवस घालवायचं ठरवलं असं दिसतं. लेख वाचत गेले तरी मला स्वत:ला पक्कं असं मत बनवता आलं नाही. एकीकडे जे आजार किंवा अडचणी वैद्यकीय उपचारांशिवाय बरे होऊ शकत नाहीत असे असतात तिथे हे महाराज दर्शनाला आलेल्यांना तसं स्पष्ट सांगतात. तर दुसरीकडे मला एखाद्याच्या मेंदूतली गाठ दिसते किंवा प्रेग्नंट स्त्रीचा गर्भ मुलगा आहे की मुलगी हे कळू शकतं असं म्हणतात. कदाचित आवाक्याबाहेरचे आजार बरे करतो असं सांगून रोगी दगावला तर नसती बिलामत मागे लागायची हा शहाणपणा डॉक्टरी इलाज करायचा सल्ला देण्यामागे असावा. '३ मुली आहेत' असं सांगत आलेल्या जोडप्याला 'मुलाला काय सोनं लागलंय का? ३ मुली पुरे झाल्या' अशी कानउघडणी करण्याऐवजी 'चौथी मुलगीच होणार तेव्हा सोनोग्राफी करून काय ते ठरवा. पाचवा मात्र मुलगा होईल' असं म्हणणारे हे महाराज 'दारूची सवय लागलेय' असं म्हणणाऱ्या भक्तांना मात्र ती सोडण्याची शपथ घ्यायला लावतात. बहुतेक 'मुलाचं वेड' हा आपल्या समाजातला विकोपाला गेलेला रोग त्यांना दारूइतका महत्त्वाचा वाटत नसावा. 'करणीने कोणाचं वाईट करता येत नाही. लिंबू मिळाला तर सरबत करून प्या. नारळ मिळाला तर खोबरं खा' असं म्हणणारे हे महाराज आपली आरती, आपला जयजयकार, लोकांचा आपल्या पायाच्या अंगठ्यावर नाक घासून केलेला नमस्कार का थांबवत नाहीत, नरेंद्रलीलामृताचा एक तरी पाठ रोज म्हणावा त्याने काशीला जाण्याचं पुण्य प्राप्त होतं असं का सांगतात हे एक ते जाणे आणि दुसरा तो परमेश्वर. 'नामस्मरणात वेळ गेला की विचारांच्या फ्लॉपीज लोड होतात' हे वाक्य वाचून तर प्रचंड करमणूक झाली. तरी बरंय ह्यांचं '२००६ ते २०१० दरम्यान तिसरे महायुध्द होणार' हे भाकीत खोटं झालं.

'माउली म्हणते मी अडचणी सोडवेन पण माझ्या मार्गाने जा. माझी भक्ती करा' असं ते म्हणतात. अलीकडे हे एकूण भवसागर वगैरे प्रकार मला समजेनासे झालेत. माणसाला अडचणीत टाकायला देवाने जन्म दिलाय का? बरं असेल दिला तर त्याने त्यातून आपली प्रगती करावी असा त्याचा हेतू असला पाहिजे. म्हणजे लहान मूल चालायला शिकताना अडखळतं, तोल सांभाळायला धडपडतं तेव्हा आई त्याला तोल सावरू देते. ते पडलं धडपडलं तर त्याला फुंकर घालते, त्याला प्रोत्साहन देते, ते पुढे जायला आपण आणखी काही करू शकतो का ह्याचा विचार करते. "माझ्या पाया पड, नाक घास म्हणजे मी तुला सावरेन" असं नाही म्हणत. मग देवाचा असा उफराटा न्याय का? माझा उदोउदो कर म्हणजे मी तुला तारुन नेतो हे शुध्द ब्लेकमेलिंग झालं. मग त्यातून नवससायास, मंदिरापुढे रांगा लावणे, देवाला दागिने, मुकुट अर्पण करणे असले प्रकार सुरु होतात. कधी भेटलाच कोणी सच्चा गुरु तर हे प्रश्न विचारेन म्हणते. आणि हो, हे महाराज असंही म्हणतात की 'स्वामी नरेंद्र महाराज, स्वामी नरेंद्र महाराज' असा जप करा. जो ह्या मार्गाने जाईल त्याची अडचण निवारण होईल. अडचण नक्की कोण निवारणार आहे? माउली का हे 'स्वामी नरेंद्र महाराज'????

लेख वाचून पु.लं. च एक वाक्य आठवलं - जगात कुंभार थोडे आणि गाढवं फार. तस्मात कुंभार हो, गाढवांस तोटा नाही. :-)
कधीकधी देवाजी कृपा करतो आणि ToDo List वर अनेक वर्षं असलेली गोष्ट पटकन घडवून आणतो. रामदास पाध्येंचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ पहावा असं कधीपासून मनात होतं. पण कधी संधीच मिळाली नाही. एक तर त्यांचे शोज परदेशात होतात किंवा भारतात झाले तर कॉर्पोरेट शोज होतात. सामान्य लोकांसाठी त्यांचे शोज आजवर झाले असतील तर निदान मी तरी कधी त्याची जाहिरात पाहिल्याचं आठवत नाही. पण मागच्या आठवड्यात अर्धवटरावला १०० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांचे शोज होत असल्याची बातमी वाचली आणि लगेच तिकीट काढून आणलं.

अर्धवटरावला १०० वर्षं पूर्ण झाली? माझ्याही मनात हाच विचार आला. हे कसं शक्य आहे? पण रामदास पाध्येंच्या वडिलांनी स्केच देऊन ब्रिटनमधल्या एका कंपनीकडून हा बाहुला खास बनवून घेतला होता तो १९१६ मध्ये. तेव्हा भारतात अश्या बाहुल्या बनवायचं तंत्र अजून विकसित झालेलं नव्हतं. म्हणजेच अर्धवटराव ह्या वर्षी चक्क शंभरीचा झाला :-)

शोच्या सुरुवातीला झालेलं गाणं पाहून हा शो फक्त मुलांसाठी आहे की काय अशी शंका आली. पण बरेचसे सिनियर सिटीझन्स आरामात बसलेले पाहून तसं नसावंसं वाटलं. आणि ते खरंही होतं. Tom The Terrific ह्या त्यांच्या नव्या भावल्याला घेऊन रामदास पाध्ये रंगमंचावर आले आणि पुढले अडीच तास त्यांनी मला माझं वय विसरायला लावलं. Tom The Terrific चा हजरजबाबीपणा, राजस्थानी कठपुतलीचा नाच (एकच बाहुली पण एकदा उलट केली तर बाहुली आणि पुन्हा उलट केली की बाहुला!), हाताची बोटं घालून वापरायचा छोट्या वाघोबाचा बाहुला, तेव्हढीच छोटी माऊ, हातरुमालाचा वापर करून अक्षरश: सेकंदात उभा केलेला छोटा ससूल्या आणि त्याच्यासोबत मोठा ससोबा, पाण्याखालच्या जगातले कासव, मासे, सीहॉर्स सारखे प्राणी - सगळ्यांनी नुसती धमाल उडवून दिली. माझ्या आसपासची बच्चेकंपनी टाळ्या पिटून नाचत होती. मध्यंतराआधी अर्धवटरावाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेणारी एक छोटी फिल्म दाखवण्यात आली. मध्यंतरानंतर अर्धवटराव स्वत:च रंगमंचावर अवतरले. नंतर 'तात्या विंचू' ने सुध्दा एन्ट्री केली. रामदास पाध्येंच्या मोठ्या मुलाने, सत्यजितने सुध्दा छान कार्यक्रम सादर केला. खरं तर पत्नी अपर्णासोबत त्यांचं अख्खं घरच ह्या कार्यक्रमात छानपैकी सामील झालं होतं असं म्हणायला हरकत नाही. फक्त नरेंद्र मोदी आणि अमिताभ बच्चन ह्यांच्या बाहुल्यांचा भाग म्हणावा तितका रंगला नाही, थोडा लांबल्यासारखाही वाटला. १-२ अधिक सेलेब्रिटीजच्या बाहुल्या आणल्या तर हा भागही मनोरंजक होऊ शकतो. तसंच प्रेक्षकांत लहान मुलं बरीच होती त्यामुळे काही 'प्रौढांसाठी' असलेले विनोद टाळता आले असते. पण एकंदरीत रविवारच्या दुपारची झोप सोडून, तेही पाऊस पडत असताना, तंगडतोड करत गेल्याचं अगदी सार्थक झालं.

तेव्हा थोडक्यात सांगायचं तर घरात बच्चेकंपनी असेल तर हा शो बघायलाच हवाच. पण तुम्ही 'प्रौढत्वी निज शैशवास' जपणाऱ्यांपैकी असला तरी हा शो नक्की बघा.
काल ग्रोसरी स्टोअर मध्ये खरेदी करताना तिथे काम करणारे तीन कर्मचारी आपापसांत बोलत होते - २ बायका आणि एक पुरुष. संवाद असा झाला:

महिला नं. १: (पुरुषाकडे पाहून) कसलं रे रिमांयडर?
पुरुष: आजचं संध्याकाळचं...सैराट चं.
महिला नं. १: आज आहे?
पुरुष: हो
महिला नं. २: सैराट क्या है?
महिला नं. १: मला तो पिक्चर बघितला की काय वाटतं माहीत आहे?
पुरुष: मुव्ही है....आप मराठी में बात कर सकते हो ना?
महिला नं. २: हां....पर तुम्हे पता है ना मै मुस्लीम हु
पुरुष: मग मराठीत बोला ना
महिला नं. १: मला तो पिक्चर बघितला की काय वाटतं माहीत आहे? इथे येणाऱ्या सगळ्यांना मारावं.

हा संवाद ऐकून मनात अनेक प्रश्न आले. पण मी आपलं सामान घेतलं आणि चेकआऊट काउंटरच्या दिशेने चालू पडले कारण मी बोलणाऱ्यांचे चेहेरे पाहिले नव्हते. बहुतेक ते गंमतीने एकमेकांशी बोलत असावेत. पण तरी वाटलंच तसं नसेल तर? समाजात जे चाललंय ते पिक्चरमध्ये दाखवलं जातं ते बरं आहे नाहीतर असं काही होतंय हे कळलंसुध्दा नसतं - हे बरोबर आहे. पण असं माहीत झाल्यावर त्याचे उफराटे परिणामसुध्दा होऊ शकतात त्याचं काय करायचं?

Sunday, October 2, 2016

खुद को समेटके...खुद की ही
बाहोंमें सिमट जाते है हम...

एक याद उसकी आती है
फिरसे बिखर जाते है हम

(Forwarded)

Grey's Anatomy, Season 12

Barely a third of the way into this season and I am already fighting down the urge to abandon watching it altogether. It is difficult to point out a single reason for this fatigue. In fact, I am quite sure that there is more than one reason to do that.

First of all, I feel tired by the sheer amount of emotional drama this time around. Every character seems conflicted - with the exception of Alex Karev. Meredith and Amelia are constantly at each other's throats. Jackson and April are fighting. Jo is being selfish. Edwards is reeling under a superiority complex. Bailey, who used to be my role model once, has been walking on cloud nine since becoming the Chief. Weber seems lost.

Second, the females have suddenly decided to make full use of their vocal chords. Amelia, Meredith, Maggie, Jo, Edwards, April, Arizona, Callie - they have been talking their heads off. I don't know how the men have been able to stand it for so long but at least I am losing it. How I wish someone would yell 'Shut Up' once in every episode.

Third, there is just too much of sex. Sometimes I wonder if I am watching 'Sex And The City' instead. Everyone seems to be having just that one thing on their mind. I am amazed they are able to concentrate at all on the surgeries and patients.

And lastly, the medical aspect of the show seems to have been firmly pushed to the background. There is more misunderstanding, yelling, explanations, doubts and conflicts than diagnosis, medicines, diseases and cures. Seriously guys, if we want drama we will go watch something else.

I can't believe I have 16 more episodes to go before this season ends. I doubt if I have it in me to keep watching. And that's a shame because this used to be one of my favorite shows :-(