Wednesday, August 30, 2017

अर्ज किया है.....

सीख नही पा रहा हू मिठे झूठ बोलनेका हुनर

कडवे सचने हमसे जाने कितने लोग छीन लिये

(Forwarded)
An Actor Prepares, Building Up Of A Character -  Konstantin Stanislavsk

Rare Gems - Aditya Mehendale

Cooking Of Maharaja: The Royal Recipes Of India - Shivaji Rao; Shalini Devi Holkar

Inside The Tornado, The Gorilla Game - Geoffrey Moore

In Search of Excellence -  Tom Peters and Robert H. Waterman, Jr.

Fantasyland: How America Went Haywire – Kurt Andersen

Hillbilly Elegy – J.D. Vance


चंदेरी दुनियेत – लीला चिटणीस


लीला चिटणीस म्हटलं की माझ्या डोळ्यांसमोर येते ती परिस्थितीने गांजलेली, नवर्याचा मृत्यू झाल्याने किंवा त्याने सोडून दिल्याने मुलांना एकटीने कष्ट करून वाढवणारी, त्यांच्यावर चांगले संस्कार करणारी,पण सदोदित रडणारी आजारी आई. ह्या अभिनेत्रीने कधीकाळी नायिकेच्या भूमिका केल्या होत्या, नाटकातून कामं केली होती हे वाचून मला बराच धक्का बसला. अर्थात अशोककुमारचा 'महल' पाहिल्याची चूक केल्याने कंगन. बंधन आणि झुला हे ते तिन्ही चित्रपट कधी बघायची वेळ आलीच तर जवळ एक बामची बाटली घेऊन बसावं लागणार ह्याची खात्री आहे :-) पण तरुणपणीच्या लीलाबाई दिसतात तरी कश्या आणि अभिनय कसा करतात ते पाह्यची मोठी उत्सुकता मात्र हे पुस्तक वाचून लागली आहे. तेव्हा ह्यातला एखादा तरी चित्रपट बघणं 'बनता है'.

हे पुस्तक फक्त त्यांच्या आयुष्याची कथा नाहीये तर त्यांची चित्रपटसृष्टीतली कारकीर्द, त्यात त्यांना आलेले अनुभव, त्यांचं व्यक्तिगत जीवन, स्वतंत्र होण्याआधीच्या भारतातलं जीवन, त्यावेळच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडी, तेव्हाच्या काळात बनणारे चित्रपट, त्यात काम करणारे दिग्दर्शक, निर्माते, नायक, नायिका, चरित्र अभिनेते, एक्स्ट्रॉज, गीतकार, संगीतकार, केमेरामन, बाकी तंत्रज्ञ, तेव्हाची टेक्नोलॉजी, शुटींगमध्ये येणाऱ्या अडचणी, त्यावर केलेली मात, तेव्हाच्या चित्रनिर्मिती संस्था (प्रभात, बॉम्बे Talkies) , चित्रपटांचं वितरण, प्रदर्शन असा एक विस्तृत पट त्यातूनआपल्यासमोर उलगडतो. उदा. त्या काळातले चित्रपट पाहताना मध्येमध्ये कंटिन्यूइटीची गोची झालेली आढळते ते पाहून हसू येतं. पण ही कंटिन्यूइटी सांभाळण्याचं काम किती जिकिरीचं आहे ते हे पुस्तक वाचून ध्यानात येतं. एक चित्रपट, मग तो कितीही टुकार का असेना, बनवायचा तर किती लोकांचे श्रम लागतात ते वाचून तर भारतात इतके चित्रपट तेव्हा बनत होते हयाचंच आश्चर्य वाटतं.

लीलाबाईच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल बोलायचं झालं तर नवर्याच्या देशप्रेमाने भारून गेलेल्या कामात स्वत:ला झोकून देणाऱ्या साध्या गृहिणीकडून एक प्रथितयश अभिनेत्री, घटस्फोटिता ते लिव्ह-इन रिलेशनशीप मध्ये रहाणार्या स्त्रीपर्यतचा प्रवास आश्चर्यकारक आहे. अगदी 'हीच का ती स्त्री' असं वाटण्याइतपत. खरं तर हंसाबाई काय किंवा लीलाबाई काय, पण ह्या चित्रपटसृष्टीच्या मोहमयी दुनियेत वावरणाऱ्या लोकांचे संसार सुखाचे का होत नाहीत हे कोडं आहे.

तरी एक प्रश्न पडतोच. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये खास स्त्रीप्रधान भूमिका बनायला आत्ता आत्ता सुरुवात झाली आहे. तेव्हाच्या काळात तर त्या असणं अशक्यच. त्यामुळे एक ठराविक वय ओलांडल्यानंतर स्त्री अभिनेत्रीला आई/सासू अश्याच भूमिका करणं क्रमप्राप्त होतं. पण त्याच त्याच चाकोरीतल्या गरीब आईच्या भूमिका करताना लीलाबाईमधल्या अभिनेत्रीची काय प्रतिक्रिया होती?

केवळ एका अभिनेत्रीच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल नव्हे तर ३० ते ७० सालातल्या हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता असलेल्यांनी नक्कीच वाचावं असं हे आत्मचरित्र आहे.

सांगते ऐका - हंसा वाडकर

ह्याही पुस्तकाबद्दल खूप ऐकलं होतं. म्हणून आवर्जून लायब्ररीत ते माझ्यासाठी काढून ठेवायला सांगितलं होतं. पण पुस्तक पाहिल्यावर माझी प्रतिक्रिया म्हणजे 'हा पुस्तकाचा पहिला भाग आहे का?’ पुस्तक काढून देणारी सहाय्यक मुलगी गोंधळली. ‘नाही हो, हे एकच पुस्तक आहे'. ‘हे एव्हढंच?’ मी चकित. पण ते पुस्तक फक्त ८०-८५ पानांचंच होतं हे खरं. पुढे पुस्तकाची प्रस्तावना वाचताना लक्षात आलं की माणूस नावाच्या मासिकाच्या दिवाळी अंकात हंसा वाडकर ह्यांचा एक लेख प्रसिध्द झाला होता. तो आणि पुढे त्याच मासिकात प्रसिद्ध झालेले काही लेख एकत्र करून हे आत्मचरित्र बनवलं आहे. ७०व्या दशकाच्या सुरुवातीला ह्यात भर घालायचं असं ठरलं आणि हंसाजींनी सुध्दा उत्साह दाखवला होता पण त्यांची प्रकृती भिघडली आणि मग काही वर्षांतच त्यांचं निधन झालं म्हणून ते काम होऊ शकलं नाही. रसिकांच्या दृष्टीने हे फार वाईट झालं पण नियतीपुढे इलाज नाही. असो.

लेख जोडून केलेलं पुस्तक असल्याने ह्यात टिपिकल आत्मचरित्रात आढळतो तो सुबकपणा किंवा रेखीव मांडणी नाही. जसं आठवलं तसं ते लिहिलं गेल्याचं जाणवतं. माझ्या पिढीला हंसाजींचं फक्त नाव ऐकून माहित. नाही म्हणायला 'भूमिका' मधली स्मिता पाटीलची व्यक्तिरेखा त्यांच्या जीवनावर बेतली आहे असं वाचलं होतं. पण तो चित्रपट काही पाहिलेला नाही. त्यामुळे त्यांचं लहानपण, चित्रपटसृष्टीतला प्रवेश, तिथे आलेले नानाविध अनुभव, तिथली काम करायची पध्दत ही सगळी माहिती नवी होती. अर्थात पुस्तकात बरेच प्रश्न अनुत्तरीत राहिले. उदा. लेखिका जोशी नावाच्या त्या गृहस्थाबरोबर त्यांच्या गावी का गेल्या? त्या magistrate च्या घरात त्यांनी आरडाओरडा का नाही केला? अर्थात ह्यात काही लपवण्याचा हेतू नसून केवळ लेखात अत्यावश्यक तेव्हढीच माहिती आल्यामुळे हे सर्व राहून गेलं असावं हे जाणवतं. हंसाजींना अधिक वेळ मिळाला असता तर ह्या प्रश्नाची उकल झाली असती. पुस्तकात फार फोटो नाहीत ही एक उणीव वाटते. निदान लेखांचं पुस्तकात रुपांतर करताना ते समाविष्ट करायला हवे होते असं वाटतं.

पुस्तक वाचून हे प्रकर्षाने जाणवतं की हंसाजींनी जे लिहिलं आहे ते अगदी प्रांजळपणे लिहिलंय. आपले पती आपल्याला समजून घेऊ शकले नाहीत ही खंत व्यक्त करतानाच कदाचित मी त्यांना समजून घेऊ शकले नसेन हे त्या मोकळेपणाने कबूल करतात. कुठेही कुठलाही कडवटपणा न येऊ देता जे घडलं ते तसंच्या तसं सांगणारं हे आत्मचरित्र म्हणूनच वाचायला हवं.

Deja Vu 26 July 2005


I wasn’t in Mumbai when 26 July 2005 happened. So I cannot say whether it was a case of Deja Vu or not. But others, including the high decibel ‘The Nation Wants To Know’ type TV channels, assure me that it was. Okay. Heavens opened up, the city flooded, traffic jammed, trains stopped, people suffered, BMC was cursed......all went as per the script that’s enacted once or twice every monsoon. Even the ‘Mumbaikars helped each other out in moments of crisis’ part of the news broadcast sounded the same.

But there was no Whatsapp in 2005. I know I belong to the Laggards category of technology adoption life cycle so I installed Whatsapp when everyone, his mom and even granny were already there. That was in 2015 – post-monsoon to be precise. To the best of my knowledge there wasn’t any 2005 like situation in either 2015 or 2016, though I am sure we must have come perilously close to it once or twice, given the BMC’s inefficiency and an average Mumbaikar’s lack of civic sense. But I didn’t see much griping on Whatsapp about it.

Until today that is. The message came on our Sanskrit class Whatsapp group (which till today didn’t have a single post that was out of sync with the group’s mandate!) and was forwarded by, of all the people, our teacher! I was sad. Till I read it. Then I was angry. The gist was that when a simple vada-pav vendor on the street - whose livelihood depends on his business - could offer free food to help out stranded people, big chains like McDonald’s and Burger King did no such thing. Shame on the MNCs and all that!

Now, I got riled on two counts. Three actually. But I will let go of the disappointment that I felt on seeing this message on our Sanskrit group. So two. First, I don’t remember reading anywhere that our very own ‘Indian To The Core’ grocery chains like Sahakar Bhandar and Nature’s Basket handed out bags of chips and glasses of juice to stranded people. And why not? Because they, just like McDonald’s and Burger King, are businesses – for profit. They have shareholders and investors to answer. If they have to do charity, they do it through CSR. They cannot hand out free food. Not to mention that if they went nuts and did that, we Indians will queue up outside, whether we are stranded or not, and eat our way to their bankruptcy. :-(

Which brings me to the second point. Did the rain dissolve money in people’s pockets? If not, why should the Vada-pav vendor offer free food to them? Even if he did that through the goodness of his heart, wasn’t it the receiving people’s duty to duly pay him?

As far as good Indians go, well, the cab and rickshaw drivers who charged twice or thrice the normal fare amount to transport people and made hay while the sun didn’t shine were Indians, no? Even the vegetable vendors were selling coriander worth Rs. 10 for Rs. 30 today.

Mera Bharat Mahaan!