Thursday, September 5, 2013

I cannot be counted among the fans of the ruling UPA regime. But I am not rooting for the opposition either. Recently, someone on my B school Alumni network had sent a link to a survey which asked a couple of questions about the political scene in the country and opinion on the possibility of a new political party. I remember that one of the questions was if I have ever attended a rally or a meeting for a political party. I replied in the negative. The next one was 'what would convince you to attend one if it is arranged in your city'. I was sorely tempted to reply 'I would attend one only if God Almighty were Himself to come down and tell me to do so'. I highly doubt if that would be convincing enough.

I would laugh at the whole government-opposition fiasco if it were not for the fact that they are slowly eroding whatever is left of the democratic fabric of this country. The passing of the long-pending Pension Bill in the Lok Sabha is a case in point. The government had to run from pillar to post to secure opposition's support for the same. And yet, all the political parties were in unison when they appealed to the Supreme Court "to review its earlier decision of barring convicted law-makers from continuing in Parliament or State assemblies'. They are arguing that complaints can be filed against the politicians for simply doing their job. What a joke! Whoever has heard of a politician doing his or her job in this country?? Their other argument is that such complaints can be politically motivated. If so, then a due investigation will expose their baseless nature. Or have they lost faith in the country's judiciary system that they always ask the Common Man to trust?

In case you think this was an isolated case of all the parties finding themselves on the same side, think again!They did it again when it came to clearing an amendment in the Right to Information Act - for exempting political parties from its purview. Talk of birds of a feather flocking together!

Hats off to the Supreme Court for rejecting government's appeal about the convicted law-makers. At least someone is doing their job in this country!
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू: गुरुर्देवो महेश्वर:
गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:

आज सकाळी हा श्लोक एसएमएस मधून आला आणि मन खूप मागे भूतकाळात गेलं - शाळेच्या दिवसात. शिक्षकदिनाच्या निमित्ताने तेव्हाचे अनेक शिक्षक-शिक्षिका आठवले. आपल्याला त्यांना कुठेही पाहिलं तरी त्यांना ओळखता येतं. पण त्यांच्या हाताखालून एव्हढे विद्यार्थी गेलेले असतात की त्यांना सगळे आठवणं अशक्यच असतं. वर तेव्हाचे आपण आणि आत्ताचे इतक्या वर्षांनंतरचे आपण ह्यात नाही म्हटलं तरी खूप फरक पडलेला असतो.

बालमोहन मधल्या माझ्या शिक्षकांत मला सर्वप्रथम आठवतात त्या चौबळ बाई. मजा म्हणजे तेव्हा मला त्यांचा खूप राग यायचा. कारण त्या नेहमी आम्हा सगळ्यांना मराठीचा धडा शिकवताना 'तुम्ही अमुक पुस्तक वाचलं का? तमुक पुस्तक वाचलं का?' असं विचारायच्या आणि मग 'वाचलं नसेलच' असं म्हणायच्या. 'माहीत आहे तर विचारतात कशाला?" असं तेव्हा वाटायचं. आता कळतं की त्यांच्या परीने आम्हा ठोंब्याना चांगलं काहीतरी वाचायला प्रेरित करायची त्यांची ती पध्दत होती. कधी दसऱ्याला शाळेत जायला जमलं तर लायब्ररी पाहून आपण तेव्हा ह्यातलं काहीसुध्दा वाचलं नाही ह्याची खंत वाटते. मराठीच्या बालभारतीतले धडे आता आठवत नसले तरी प्रत्येक पानापानांवर जमेल तितक्या बारीक अक्षरात पुस्तकांची नावं, नोट्स असं कायकाय लिहिलेलं अजूनही आठवतं.

मराठीची अशीच गोडी नववी-दहावीच्या वर्षात आठल्ये क्लासच्या विजयाताई पटवर्धन बाईंनी (आम्ही त्यांना विजुताई म्हणायचो) लावली. माझे दहावीचे सगळे मराठी विषयाचे सराव पेपर्स त्यांनी न कंटाळता कसे तपासले ते त्यांचं त्यांनाच माहीत. आठल्ये सरांनी नववी-दहावीला जे संस्कृत शिकवलं त्याचा उपयोग मला आता गीतेतले मूळ श्लोक वाचताना होतोय. सगळं वाचता येतंय अश्यातला भाग नाही. २ वर्षांच्या शिदोरीवर ते शक्यही नाही. पण श्लोकाचा मतितार्थ संस्कृत शिकून इतकी वर्षं लोटली तरी लक्षात येतोय ते फक्त त्यांच्या शिकवण्यामुळे. पुस्तकातल्या धड्यांच्या पलिकडे जाऊन इतिहास शिकवला तो गांधी सर् आणि गांधीबाईंनी. इतिहास हा विषय कधीच कंटाळवाणा वाटला नाही तो त्यांच्यामुळे. गोडसे सरांमुळे भौतिकशास्त्र (फिजिक्स) आणि रसायनशास्त्र (केमिस्ट्री) ह्यात मी पास झाले. :-)

माझं दहावीपर्यंतचं शिक्षण मराठी शाळेत झालं - अगदी विज्ञान आणि गणित सुध्दा शुध्द मराठीत. तरी कॉलेजमध्ये गेल्यावर अगदीच 'ततपप' झालं नाही ही शाळेतल्या भट बाईंची कृपा.  'पो ओ सी के ई टी पॉकेट' आणि 'ही गोज शी गोज दे गो' चा सार्वजनिक गजर अजून आठवतो. :-) आठल्ये क्लासमध्ये ह्यापुढचं इंग्लिश व्याकरण पक्कं करून घेतलेल्या बाईंचं नाव आता मला आठवत नाही हा माझा कपाळकरंटेपणा :-(

शाळेतल्या आणखी २ प्रिय शिक्षिका म्हणजे शैला परळकर आणि श्यामाताई. दोघींकडे गोष्टी सांगायची विलक्षण हातोटी होती. एखाद्या ऑफ पिरियडला त्या वर्ग सांभाळायला आल्या की आम्हाला खूप आनंद व्हायचा. मग एखादी थ्रिलर गोष्ट ऐकताना तास कधी संपला तेसुद्धा कळत नसे. त्यातल्या २ गोष्टी मला अजून आठवतात. एका गोष्टीत एका मुलाला त्याच्या पूर्वजांच्या जुन्या हवेलीत बोलावलेलं असतं. सोबत म्हणून तो आपल्या एका मित्राला नेतो. रात्री त्या मित्राला एका बाईचा कोणी माणूस खून करत आहे असं दिसतं. तो सकाळी उठून ती गोष्ट त्यांना भेटायला आलेल्या वकिलाला सांगतो आणि तो वकील त्याला खरा वारसदार म्हणून घोषित करतो. दर पिढीत मोठ्या मुलाला पूर्वी कधीतरी घडलेली ती घटना दिसत असते. आता तो मित्र त्या मुलाचा मोठा भाऊ कसा ह्याचं स्पष्टीकरण त्याच्या बाबांनी घरातल्या मोलकरणीशी लग्न केलेलं असतं असं तेव्हा मिळालं होतं हे आठवलं की आज हसू येतं. :-) दुसरी गोष्ट लपाछपीच्या खेळात एका खोलीत पेटीत जाऊन लपलेल्या आणि पेटी बंद झाल्याने आत अडकून मृत्यू झालेल्या छोट्या मुलाच्या आत्म्याची होती.

बीजगणित (अल्जिब्रा) शी माझं सख्य असलं तरी भूमिती (जॉमेट्री) हा मोठ्ठा शत्रू होता. विजया चौधरी बाईंनी भूमिती आणि जीवशास्त्र (बाप रे! कित्ती दिवसांनी हा शब्द वापरला) म्हणजे बायोलॉजी एकदम सोप्पे केले होते. बायोलॉजी माझा आवडता (आणि स्कोरिंग) विषय होण्याचं सारं श्रेय चौधरीबाईंचंच.

आमच्या शाळेत कार्यानुभव, शिवण, फिजिकल ट्रेनिंग (अर्थात पी.टी.), गायन आणि चित्रकला हे विषय सुध्दा होते. पण त्यातल्या एकातही मला फारशी गती नव्हती. तसंही ह्या विषयात नैपुण्य आणि त्यामुळे आवड असणारया विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येक वर्गात कमी असणार हे सांगायला नको. पण त्यामुळे त्या शिक्षकांचं महत्त्व कमी होत नाही. त्या सगळ्यांनी ते विषय तेव्हढ्याच तळमळीने शिकवले हे नक्की.

रुपारेल मध्ये मी २ च वर्ष होते त्यामुळे तिथल्या शिक्षकांशी फार जुळलं नाही किंवा जुळायला वेळ मिळाला नाही असंही असेल. पण फारसं कोणी आठवत नाही ही वस्तुस्थिती आहे.

व्हीजेटीआय मधले ३ शिक्षक प्रकर्षाने आठवतात - तिघेही पहिल्या वर्षीचे.  कम्युनिकेशन स्किल्स शिकवणाऱ्या मेडम - ह्यांचं नाव आता आठवत नाही. इंजिनीयरिंग Drawing सोपा करणारे वेणुगोपाल सर् आणि इंजिनीयरिंग Mechanics शिकवणारे जोशी सर.

आयएसबी मध्ये Options and Futures शिकवणारे आमचे तेव्हाचे डीन प्रोफेसर राममोहन राव, प्रोफेसर रवी बाफना, Accounting चे प्रोफेसर मार्क फिन, मार्केटिंग शिकवणारे प्रोफेसर जगमोहन राजू हे खास करून आठवतात. फायनान्स म्हणजे रटाळ कठिण प्रकार आहे असं वाटणार्या मला स्वत:च्या इन्व्हेस्टमेंटस् स्वत: मेनेज करायचा विश्वास आयएसबी मधल्या फायनान्सच्या प्रोफेसर्समुळेच मिळाला.

काय मजा असते ना? जेव्हा आपले शिकायचे दिवस असतात तेव्हा एखादा दिवस का होईना पण पिरीयड बंक करावेसे वाटतात. आणि आज वाटतंय की पुन्हा एकदा विद्यार्थी व्हावं आणि ह्या शिक्षकांचा एक तरी पिरीयड अटेंड करायला मिळावा.

जीना इसीका नाम है :-)

Tuesday, September 3, 2013

Men are only as loyal as their options

-- Bill Maher
ह्या वर्षी जन्माष्टमीचा मुहूर्त साधून पुन्हा एकदा Bhagawad Gita As It Is वाचायला घेतलं आहे. मागच्या वेळी काही अध्यायांनंतर पुढे वाचायला जमलंच नाही. ह्या वेळी मात्र वाचून पूर्ण करायचंच असं ठरवलंय. मग भले रोज दोन पानंच वाचून झाली तरी चालेल.

अजूनपर्यंत फक्त Introduction वाचून झालंय. तरी २-३ प्रश्न पडलेत. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की माझी भक्ती करायला सगळी कामं सोडून द्यायची गरज नाही. ती करता करता भक्ती कर. आता हे कसं जमायचं? म्हणजे एखादा सर्जन आहे तो ऑपरेशन करता करता 'हरे राम हरे कृष्ण' असं कसं म्हणू शकेल? मी एक प्रोजेक्ट मेनेजर आहे. तर क्लायंटशी बोलताना किंवा माझ्या टीमसोबत मिटींग करताना कृष्णाचं नाव घेणं कसं शक्य आहे? आता दुसरा प्रश्न असा की संत तुकाराम व्यवसायाने वाणी होते हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण दुकान चालवता चालवता ते भजनात रमून जायचे आणि त्यापायी दुकान शेवटी बुडालं. ह्याचा अर्थ भक्ती आणि दररोजच्या जगण्यातला व्यवहार ह्याची सांगड घालता येणं कठिण आहे असा घ्यायचा का? एके ठिकाणी कृष्णाने असंही म्हटलंय की जो भक्तीभावाने गीताश्रवण करेल त्याची सारी पापं धुतली जातील. समाजात असेही लोक असतील जे आयुष्यात वाईट कामं करत असतील, दुसर्याला फसवत असतील, पण तरीही हे जे सत्संग होतात तिथे जाऊन भक्तीभावाने गीतेवर प्रवचन ऐकत असतील. जे ऐकतात ते तिथेच बुवांच्या पायाशी सोडून पुन्हा अनैतिक गोष्टी करायला मोकळे होत असतील. गंगेत डुबकी मारून पापं धुतली जातात म्हणून 'सौ सौ चुहे खाकर बिल्ली चली हजको' ह्या न्यायाने तीर्थक्षेत्री जाणारे नमुने काही कमी नाहीत. अश्या लोकांची पापंसुध्दा गीताश्रवणाने धुतली जात असतील तर 'ये सरासर ज्यादती है मिलोर्ड' :-)

असो. आगे आगे देखते है होता है क्या :-)
यंदा कोणालाच जन्माष्टमीच्या शुभेच्छा देता आल्या नाहीत आणि संध्याकाळी बाहेर पडल्यावर जो धुडगुस पाहिला त्यामुळे त्या दिल्या नाहीत तेच बरं केलं असं वाटलं. आधी दिसले ते बसेस, मिनिबसेस, ट्रक्समधून कर्णकर्कश आवाजातली गाणी लावून आरडाओरडा करत जाणारे किंवा तिघांच्या संख्येने बाईक्सवरून जाणारे गोविंदा. दोघांत साम्य एकच - लाल सिग्नल असतानाही कोणाचीही परवा न करता सिग्नल तोडून बेदरकारपणे पुढे जाणे. त्या दिवशी शिवाजी पार्कमध्ये गेले होते. पार्कच्या कडेचे सर्व बांध जेवणारया गोविंदा पथकांनी काबीज केले होते. जिकडे पहावं तिकडे थर्माकोलच्या त्या ३ कप्पे असलेल्या थाळीत पावभाजी खाणारे गोविंदा. जिथून लोक चालतात त्या आतल्या रस्त्यांवर बटाटे, पावाचे तुकडे, टोमेटो सांडलेले. ते येणारयाजाणाऱ्या लोकांच्या पायाखाली येत होते. केव्हढा हा अन्नाचा अपव्यय आणि अपमान! एके ठिकाणी तर लोकांच्या चालायच्या वाटेवर पूर्वी लग्नाच्या पंगतीत बसायचे तसे समोरासमोर २ रांगा करून गोविंदा बसलेले आणि त्यांना वाढणारे स्वयंसेवक. वयोवृद्ध मंडळी, छोट्यांना फिरायला घेऊन आलेल्या बायका, लहान मुलं सगळे चिखल झालेल्या मैदानातून कसेबसे वाट काढत चालले होते. आणि हे लोक बेशरमपणे आपण दहीहंडी फोडतोय म्हणजे आपल्याला हवं तसं वागायचा मक्ता मिळालाय अश्या थाटात बसलेले पाहून डोक्यात तिडीक गेली. कोणी दिला ह्या लोकांना हा हक्क? आणि पोलीस उद्यान गणेशाच्या मंदिरासमोर 'रक्ष रक्ष परमेश्वरा' करत बसलेले. नुसती चिडचिड झाली. १-२ ठिकाणी काही कुठल्यातरी मंडळाचे टी-शर्ट घातलेले गोविंदा इथेतिथे पसरले होते. दमून झोपले असतील असं वाटावं अशी सध्याची परिस्थिती नाही आणि तेव्हढा भाबडेपणाही आता उरला नाही. 'पिऊन पडलेत मेले' असच वाटलं. कसले दिवस आलेत?

मला एकदम लहानपणीचा शाळेतला दहीहंडीचा कार्यक्रम आठवला. अगदी सगळे तपशील आता आठवत नाहीत. पण कॉमन हॉलमध्ये कृष्णाच्या बाळरुपाचा एक मनमोहक फोटो ठेवलेला असायचा, मग 'गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा' चा गजर करत हंडी फोडली जायची. फुटलेल्या मडक्याचे तुकडे गोळा करायला झुंबड व्हायची. हे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले की घरात दहीदुधाची कधीच कमतरता भासत नाही असा एक समज होता त्यावेळी. खरं पाहिलं तर तेव्हा घरात कधीच दह्यादुधाची कमतरता नव्हती. आई दर वर्षी ते तुकडे फेकून देते हे माहीत असूनही का कोणास ठाऊक मी ते दरवर्षी घरी आणायचे. आता मोठी झाले. जरा जास्तच मोठी झाले. आता तो निरागसपणा नाही तर भोळसटपणा वाटतो. 'किती अनहायजिनिक असेल ते' असं वाटतं. आणि तरीही कधी काळी टाईम मशीनची सोय झालीच तर पुन्हा एकदा शाळेतल्या दहीहंडीला जावं असंच वाटतं.

आजूबाजूला काय घडतंय ते पाहून, वाचून कधीकधी खूप भीती वाटते. ब्रेक फेल झालेल्या गाडीत बसून आपला समाज अगदी उताराला लागलाय असं वाटतं. आपण नुसते थिजून बसलोय. ह्या रस्त्याच्या शेवटी सर्वनाश लिहिलाय हे माहीत असूनही वेळ आहे तोवर दार उघडून बाहेर उडी मारायची हे कोणालाच सुचत नाहीये.

कदाचित 'संभवामि युगे युगे' चं वचन खरं व्हायची वेळ आली आहे.