Thursday, August 17, 2017

Learning Sanskrit – Class 8

Now we are getting into serious grammar. There is a lot of learning by heart. It has been years since I had learnt it all in school but I am hoping that a couple of iterations will bring it all back. Let’s see.

I had missed class #7 when the teacher had covered परस्मैपदी verbs. I didn’t have any problem re-learning it. She covered the other group of verbs in this class - आत्मनेपदी verbs. Luckily for me, it all came back to me after a few recitals. The trickier thing would be to remember which of the 10 groups (or गण) the verb falls in. The regular set consists of 1,4,6 and 10 and the rest fall into the irregular set. Not a pleasing thought but hardly anything can be done about it.

So we spent the evening writing down all 9 forms for one verb each from 1,4,6 and 10th group. It is a bit of a hard work but everyone is happy because we are inching towards being able to form simple but whole sentences. :-)

Howl

Anyone tuning into any of the English movie channels around 9 pm any day would agree that what’s on offer is nothing to write home about. You see the names of the action movies that have been shown countless number of times in the past. But browse the TV Guide for a while and you will notice that after midnight the list features movies that have never been shown before and have interesting plots. I cannot, for the life of me, fathom the reason for this. Why should the insomniacs be treated to a better set of movies? But that’s how it is.

So I was pleasantly surprised last week when I saw that one of the channels – I forget which one – was telecasting ‘Howl’ at 9 pm and ‘The Last Passenger’ right after that i.e. around 10:30 pm. If I mistake not, ‘The Last Passenger’ has been shown a couple of times before because I distinctly remember seeing it in the TV guide – the timing being late at night, had been, of course, very unsuitable on both occasions. ‘Howl’, however, seemed like a new offering. The plots mentioned on the guide seemed mundane but a quick search on the net revealed both to be British films. Ah well, we all know how Hollywood likes to treat its werewolves and suicidal drivers. Let's see what the British have done with them, shall we?

Howl is a 2015 direct-to-video British film. The plot revolves around a night train going from point A to point B in English countryside – I mention points A and B because I have already forgotten the names of the places - and its shy, hesitant, sort-of-clumsy guard, named appropriately enough as Joe. There aren't many passengers on this train – a rude teenage girl constantly talking on the phone, an elderly couple, an obese man with an upset tummy, an Indian guy with a nerdy look and a couple of assorted other souls just about sum up the list. Joe is particularly morose that night because he has been turned down for the post of supervisor, the girl who is he sweet on (and happens to be working on the same train that night) doesn't seem to harbor the same feelings towards him and he has been compelled to work right after completing an earlier shift. He checks everyone's tickets and settles down for what he thinks will be an average night on the routine journey. But fate has other things in store for him.

Somewhere along the journey, in a heavily forested land, the train comes to an abrupt stop after hitting something. The driver gets down to check what the problem is and is never heard from again. After waiting for him for a while, Joe, in an attempt to pacify the passengers who are getting increasingly restless, gets down himself to check on things but can't spot the driver anywhere. After a lot of discussion everyone decides to disembark from the train and make it to the next station on foot. But as they start walking they realize that something is following them through the woods and that something is not human. The rest of the story is predictable enough for anyone who has watched even a single movie with a similar storyline. It all comes down to finally who will make it to the land of the living by the time the credits roll. And most of us can make a pretty good guess about it.

The reason why I liked the movie is because the protagonist is depicted as a very unsure plain-looking fellow – very different from the hunk of an average Hollywood movie who looks like a jack of all trades and the master of each one of them. Of course, it follows that he will rise to the occasion and lead the rescue efforts. I also liked the backdrop – the sparsely populated lonely train halted right in the middle of a mysterious misty forest land, the passengers trekking through the tracks, the mad rush back to the train, the utter helplessness and the eerie feeling of being watched. It also helped that for a good part of the movie we cannot see the creatures though we can guess about their identity.

Of course, they had to ruin it all in the end by showing the werewolves that have been popularized by countless Hollywood movies :-( It also looked like none of the Britons on the train had watched even a single Hollywood movie featuring werewolves. Or else they would have known that it is dangerous to stand next to a window when the werewolves are prowling outside and anyone unlucky enough to be bitten turns into one sooner rather than later.

That said, I would still recommend this movie to those of us who don’t mind a few cliches just to see a pack of werewolves scaring the living daylights out of a group of hapless human beings :-)

Wednesday, August 16, 2017

The Good Life - by Scott Nearing

Ch’a Ching - by Lu Yu

Delivering the Goods - by Damon Schechter


Rembrandts In The Attic - by Kevin Rivette






An Account Of The War In India – Richard Cambridge

Military Systems Of Marathas – Surendar Nath Sen

Solstice At Panipat – Dr. Uday Kulkarni

The Hindu Temple – Stella Cremrish

The Great Cave Temples In India - Stella Cremrish

Floreana – Margaret Wittmer

दक्षिणरंग - मीना प्रभू

मला वाटतं मीना प्रभू ह्यांचं लायब्ररीत असलेलं हे शेवटचं पुस्तक. १९९६ सालच्या आसपास लेखिकेने केलेल्या दक्षिण अमेरिकेच्या सफारीचा वृतांत ह्यात आहे. तसं बघायला गेलं तर ह्याला वीस वर्ष लोटून गेली असल्याने ऐतिहासिक सोडले तर बाकी संदर्भ आता बरेच जुने झालेले आहेत. पण तरी २० वर्षांपूर्वी ह्या असल्या सफारी काढणं किती जिकिरीचं असेल त्याची त्यावरून पुरेपूर कल्पना येते.

पेरू, चिले, आर्जेन्टिना, ब्रझील, बोलिव्हिया, एक्वादोर आणि कोलंबिया ह्या सात देशांतला हा प्रवास. भारतीय पासपोर्टवर व्हिसा मिळवताना आलेल्या कटकटीचं विस्तृत वर्णन आहे. अजून ह्या कटकटी राहिल्या नसाव्यात अशी आशा आहे कारण हे पुस्तक वाचून ह्यातल्या किमान काही देशांना भेट द्यावीशी वाटत आहे. अर्थात आम्ही देशाटनाला निघणार म्हणजे केसरी टूर्स किंवा वीणा वर्ल्ड जिंदाबाद. काय ती माथाफोडी तेच करू देत. पण व्हिसा मिळवताना आलेल्या अडचणी काहीच नाहीत असे अनुभव एक सोडून दोन वेळा लेखिकेला इमिग्रेशनच्या ठिकाणी आले. एव्हढी अडचण सोसून हा प्रवास जिद्दीने पुरा केल्याबद्दल माझा त्यांना साष्टांग नमस्कार आहे बाबा.

लेखिका त्यांच्या नेहमीच्या शैलीत ह्या देशांबद्दल, तिथल्या संस्कृतीबद्दल, त्यांचा इतिहास, भूगोल, राजकीय परिस्थितीबद्दल भरभरून लिहितात. त्यामुळे हे कोरडं प्रवासवर्णन होत नाही. जिथे जातील तिथे भेटणारे स्थानिक हा त्यांच्या खास जिव्हाळ्याचा विषय - मग तो चिलेतला आपल्या देशाची आठवण म्हणून छोटी पिन काढून देणारा गरीब गार्ड असो, पेरूच्या बसमधली 'ओम नमो नार्रायणा' म्हणून चकित करणारी म्हातारी असो की लीमात एक हॉटेल चालवणाऱ्या केथालिक नन्स असोत. ह्या हॉटेलवरून आठवलं. लेखिकेने ह्या हॉटेलात फार लोक येत नाहीत त्यामुळे ते कितपत चालेल असं लिहिलं होतं म्हणून उत्सुकतेने नेटवर सर्च करून पाहिलं. निदान २०१६ पर्यंत तरी ते सुरु होतं हे वाचून बरं वाटलं. गालापागोसवरच्या Lonesome George ह्या त्याच्या जातीतल्या शेवटल्या कासवाबद्दल वाचून तोही तपास केला. दुर्देवाने त्याचं २०१२ मध्ये निधन झाल्याचं आणि त्याच्या मृत्यूआधी त्याचा उपयोग करून त्याच्या प्रजातीतली आणखी कासवं जन्माला घालण्याच्या प्रयत्नांना यश न आल्याचं कळलं. असो. ह्या पुस्तकात कधी नव्हे तो स्थानिक जेवणाबद्दलचा, थोडासाच का होईना, उल्लेख आलेला आहे.

मला ह्या पुस्तकातला सर्वात आवडलेला भाग म्हणजे अर्थात माचू-पिचू, गालापागोस आणि एमझोन नदीबद्दलचा. वाचून अगदी आत्ताच प्रवासाला निघावंसं वाटलं - तेही लेखिकेइतकी गैरसोयी सोसायची अजिबात ताकद नसताना. हेच पुस्तकाचं आणि लेखिकेचं यश नाही का?

माझं लंडन, नाच ग घुमा, रारंगढांग

मराठी पुस्तकंच वाचायची ह्या माझ्या निश्चयाने पुन्हा उचल खाल्ली त्याचा हा परिणाम. पुस्तकं वाचून तर झाली पण त्यांच्याबद्दल इथं लिहायचं राहून गेलं. त्यामुळे आता सामुदायिक विवाहासारखं हे सामुदायिक परीक्षण :-)

तर पहिलं पुस्तक 'माझं लंडन'. मीना प्रभू ह्यांची अनेक पुस्तकं वाचली आहेत त्यांचं रोमवरचं पुस्तक 

सोबत घेऊनच रोम पहायचं हा निश्चय करूनही युगं लोटली आहेत. लंडनवरच्या पुस्तकात वाचण्यासारखं ते काय असणार म्हणून आजवर ह्या पुस्तकाकडे काणाडोळा केला होता. पण आता एकेक लेखक-लेखिका धरून लायब्ररीत तिची वा त्याची असतील ती सगळी पुस्तकं वाचायचीच म्हटल्यावर हेही वाचून बघू म्हणून घरी आणलं. तसं ब्रिटीशांचं आणि माझं वैयक्तिक वैर काही नाही. पण आपल्यावर एव्हढी वर्षं राज्य केलं आणि जाताना फुट पाडून कायमची डोकेदुखी लावून गेले म्हणून थोडा दात आहे एव्हढंच. लग्न झाल्यापासून लंडन मध्ये रहात असलेल्या लेखिकेचं मत काय हे बघायची उत्सुकता होती. पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि वाचत गेले. पुस्तक वाचलं तेव्हा त्यातल्या बर्याच मुद्द्यांवर इथे लिहायचं ठरवलं होतं. आता मध्ये सुमारे महिनाभर गेल्याने बर्याच गोष्टी विस्मरणात गेल्या आहेत. पण लेखिकेने एकूण पुस्तकात ब्रिटीशांबद्दल कुठेही जराही कडवटपणा न येऊ दिल्याचं स्मरतंय. कदाचित इतकी वर्षं तिथे घालवल्याने असेल. असो. तर लंडनमध्ये जुन्या काळातल्या एव्हढ्या नवलाईच्या वस्तू निगुतीने जतन करून ठेवल्या आहेत हे माहित नव्हतं. आता त्या बघायला तिथे जावंच लागणार. तेही हे पुस्तक सोबत घेऊन. आपली भारतीय जीवनपध्दती, मुलांना वाढवायची पध्दत आणि तिथले विचार ह्यांच्यातला फरक जाणवून देणारे दोन प्रसंग आताच्या काळात फारसे विचित्र वाटत नाहीत. लेखिकेने जाताजाता तिथली ड्रग्जची समस्या,Child Battering, लंडन सारख्या शहरातल्या काही भागात आढळणारी गरिबी ह्यावरही भाष्य केलं आहे. त्यातली Child Battering वरची पानं दोनच होती पण तीही माझ्याच्याने वाचली गेली नाहीत. :-( मीना प्रभू ह्यांच्या पुस्तकांत कुठल्याही देशातल्या खाद्यसंस्कृतीबद्दल फारशी माहिती नसते तसंच ह्याही पुस्तकाचं झालंय. अर्थात इंग्लिश जेवणात लिहिण्यासारखं असतं काय असंही म्हणता येईल. तसंच शाही कुटुंबाबद्दल थोडी अधिक वाचायला आवडलं असतं.

वाचलेलं दुसरं पुस्तक म्हणजे माधवी देसाई ह्यांचं 'नाच ग घुमा'. काही दिवसांपूर्वी लोकसत्तामध्ये वाचलीच पाहिजेत अश्या स्त्रीचरित्रांची एक लिस्ट आली होती त्यात ह्या पुस्तकाचं नाव होतं. त्या दिवशी लायब्ररीत मराठी पुस्तकं शोधत असताना हे समोरच दिसलं आणि घेऊन आले. तसं सुनीताबाइंच्या 'आहे मनोहर तरी' वर पु.लं. चे चाहते जसे नाराज होते तसंच काहीसं ह्याही पुस्तकाबद्दल झाल्याचं वाचनात होतं. माधवी देसाई ह्या भालजी पेंढारकर ह्यांच्या कन्या, रणजीत देसाई ह्यांच्याशी लग्न व्हायच्या अगोदर त्यांचं आणि देसाईचंसुध्दा एक लग्न आधी झालं होतं ही सगळी माहिती नवी होती. पुस्तक वाचून अनेक कोडी पडली. एक तर लेखिकेने रणजीत देसाई ह्यांच्याशी लग्न का केलं ते कळलं नाही - त्यांच्यावर प्रेम जडलं म्हणून का परिस्थितीशी झगडून कंटाळा आला होता म्हणून? रणजीत देसाई आणि त्यांच्यात नक्की काय बिनसलं? घटस्फोट द्यायच्या वेळी लेखिका एव्हढ्या अगतिक का झाल्या? रणजीत देसाई ह्यांच्या पहिल्या बायकोला मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवायची वेळ का आली? पुस्तकात १-२ ठिकाणी लेखिकेचं मत परस्परविरोधी असल्याचंसुद्धा जाणवतं. एके ठिकाणी त्या आपली कुत्री आपल्यावर विश्वास टाकतात पण माणसं टाकत नाहीत त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करतात आणि नंतर आपला सासरच्या माणसांवर विश्वास नसल्याचं सांगतात. एकीकडे रणजीत देसाईच्या पहिल्या बायकोच्या मुली आईचा फोटो दाखवून आपल्याकडे रडतात असं म्हणतात आणि दुसरीकडे ह्या मुलींचा आपल्यावर विश्वास नाही असं लिहितात. खर्या आयुष्यात कोणी पूर्ण चांगलं किंवा पूर्ण वाईट नसतं असं म्हटलं तरी त्यांच्या सासरच्या लोकांची बाजू नीटपणे कळत नाही. पुस्तकभर असं वाटत रहातं कि माधवी ह्यांनी दोष आपल्याकडे घेतला असला तरी एकूणात आव 'दोष माझ्या चांगुलपणाचा आहे, माझ्या चांगल्या प्रयत्नांचा लोकांनी वाईट अर्थ घेतला' हाच आहे - मग ते गोव्याचे सासरचे लोक असोत नाहीतर कोवाडचे. हे पटत नाही. हे मी रणजीत देसाई ह्यांची चाहती म्हणून लिहित नाहीये. कारण एक लेखक आणि माणूस ह्यात जमीन- अस्मानाचा फरक असू शकतो हे मला माहित आहे. मी हे एक माणूस, एक स्त्री, एक वाचक म्हणून लिहितेय. पुस्तकात बरंच काही सांगितलेलं नाही असं वाटत राहतं. त्यामागचं कारण काय ते त्यांनाच ठाऊक पण त्यामुळे नाण्याची एकच बाजू समोर आल्यासारखी वाटते.पूर्ण पुस्तक वाचून झालं तरी मला आपला गोव्यातला त्यांना भेटलेला तो मिस्तीस अधिकारी आठवत राहिला. माझ्यातल्या eternal romantist ला आधी वाटलं ह्या का नाही निघून गेल्या त्याच्यासोबत? मग थोडा विचार केल्यावर लक्षात आलं की नीट बसलेली आयुष्याची घडी मोडून असं अनोळखी जगात जाणं सोपं नसणार - सडाफटिंग स्त्रीसाठी नाहीच आणि पदरी एक मुल असलेल्या विवाहित स्त्रीसाठी तर नाहीच नाही. तिथे जुळलं नाही तर काय करणार हा विचार असावा नक्कीच. त्यांचा नवरा छळ करणारा असता किंवा हयात नसता तर ह्या कथेला वेगळं वळण लागलं असतं कदाचित. रस्त्याला फाटे फुटतात तिथे आपण न घेतलेली वाट कुठे जाते ते कोण सांगू शकतं, नाही का?

नाच गं घुमा' मध्ये 'रारंगढांग' चा उल्लेख आला आणि ह्या पुस्तकाच्या विचित्र शीर्षकाबद्दलची अनेक वर्षांपासून असलेली माझी उत्सुकता पुन्हा जागी झाली. कशाबद्दल आहे हे पुस्तक? मला आधी वाटलं प्रभाकर पेंढारकर ह्यांचं आत्मचरित्र आहे पण पुस्तक घरी आणल्यावर लक्षात आलं की हिमालयातल्या एका दुर्गम भागात रस्ता बनवणार्या आर्मी युनिट आणि तिथे काम करणाऱ्या एका सिव्हिलीयन इंजिनियरवरची ही कथा आहे. ‘ढांग' म्हणजे आकाशाच्या पोटात घुसलेला दुर्गम अभेद्य कडा ज्यातून मार्ग काढायचा आहे. ‘रारंग' हे त्या कड्याचं स्थानिक भाषेतलं नाव. त्या इंजिनियरचं नाव, मला वाटतं, विश्वनाथ. चांगली मोठ्या पगाराची नोकरी सोडून आपल्या ज्ञानाचा लोकांना, देशाला फायदा करून द्यावा म्हणून तो आर्मीसोबत ३ वर्षांचा करार करून येतो. त्याची ह्या ढांगातून रस्ता काढायच्या कामावर नेमणूक होते पण आर्मीचे स्वत:चे कायदे असतात - काही लिखित, काही न लिहिलेले. त्यातले सगळेच विश्वनाथला पटतात असं नाही. आणि मग 'ब्लडी सिव्हिलीयन' अशी संभावना ठरलेली. त्यात हा रस्ता काढण्यापूर्वी काही आवश्यक बाबी नीट तपासल्या गेल्या नाहीत हे त्याच्या लक्षात येतं. तो आपल्या परीने त्या तपासून घ्यायचा आणि वरिष्ठ अधिकार्यांच्या ते लक्षात आणून द्यायचा प्रयत्न करतो. पण 'हाताखालच्या अधिकार्यांनी वरून आलेले आदेश पाळलेच पाहिजेत' ही सैन्याची शिस्त आणि काम ठराविक वेळेत पूर्ण करायचा दबाव ह्यामुळे त्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष होतं आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम होतो. मग पुढे सिव्हिलीयन इंजिनियर विश्वनाथ काय करतो हे वाचण्यासारखं आहे. हिमालयासारख्या दुर्गम भागात रस्ते बनवायचं काम सोपं नसणार हे आपल्याला माहित असतं पण कायकाय अडचणी येऊ शकतात ते हे पुस्तक वाचल्यावर कळतं. विश्वनाथच्या भोवतीच्या मेजर बंगा, नायर, सुभेदार, बहादूर ह्या व्यक्तिरेखात आपणही गुंतत जातो. आर्मीची बाजू कळते पण पटत नाही. विश्वनाथची बाजू अधिक पटत राहते. आपण सिव्हिलीयन म्हणून की काय कोण जाणे. एका वेगळ्या विषयावरचं म्हणून हे पुस्तक नक्कीच वाचनिय आहे.